||श्री:||
"मनुष्य गौरव दिन"
ज्या ज्या ऋषितुल्य व्यक्तींमुळे माझ्या जीवनाला, विचारांना आकार आला त्यातील एक ऋषीतुल्य विभूतिमत्व म्हणजे "प.पु. दादा" (अर्थात पांडुरंग शास्त्री वैद्यनाथ शास्त्री आठवले).
रायगड जिल्ह्यातील रोह्या सारख्या छोट्या गावात जन्माला येऊन सुद्धा भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंतरात घेऊन जाऊन कीर्ती प्राप्त केलेला "अगस्ती".
कोणतीही सत्ता, सामर्थ्य मागे नसताना सुद्धा पूर्व व पाश्चिमात्य संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणाररी तत्वज्ञान विद्यापीठा सारखी पूर्णतः देवावर विसंबून असलेली संस्था यशस्वी रीतीने चालवून जणू काही प्रतिसृष्टी निर्माण करणारे "विश्वामित्र".
जीवनात असंख्य चढउतार येऊन सुद्धा आयाचक व्रताने आ.ताईंसोबत आदर्श संसार करणारे "वसिष्ठ".
योगेश्वर कृषीच्या रूपाने भगवंताचं शेत करणारे लाखो पुजारी तयार करुन कृषीतून वैचारिक क्रांती घडवणारे "गौतम".
ज्ञान-कर्म-भक्ती ह्या चिरंतर "त्रयी"चा संगम घडवून "त्रिकाल संध्येच्या माध्यमातून" सन्मिलित पुनरुज्जीवन करणारे "अत्री".
जात-पात-पत-प्रतिष्ठा-पॉवर(ताकद) ह्यांचे जोडे बाहेर ठेवायला लावून; भगवंताच्या समोर एक परिवार म्हणून एकाच बैठकीवर बसून स्वाध्याय करायला लावणारे. ज्याला अध्यात्मात कोणीही थारा दिला नाही त्या प्रत्येकाला आपलेसे करणारे "कश्यप"
भगवान श्रीकृष्णाच्या गीतामृतांतुन वेळ आली तर २१ वेळा पृथ्वी नरेशांना आव्हान देण्याचे सामर्थ्य ठेवणारे आत्मविजयी परशुराम निर्माण करणारे "जमदग्नी"
अश्या एक ना अनेक रुपांत सात रंग भरून भाव-सौरभ भरणारे दादा आज ही माझ्या सारख्या लाखो स्वाध्यायींच्या हृदयात कायम आहेत.
ज्याच्या दिवसांची सुरुवात "कराग्रे" नी होते. तो स्वाध्यायी .....
भगवंत माझा आहे....,
भगवंत माझ्या सोबत आहे ......,
भगवंत माझ्यातच आहे ....
व माझ्या प्रत्येक कर्माला तो साक्षी आहे ही जाणीव ठेवणारा प्रत्येक जण स्वाध्यायी ....
भले त्याचे हात तो आज केंद्रात जात असो वा नसो.....
एकदा स्वाध्यायी .... जीवनभर स्वाध्यायी .....
कारण जीवन भरुनही दहा अंगुळे उरण्याची ताकद ही स्वाध्यायात आहे....
गीतेच्या तत्वज्ञानात आहे ....
हे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत आणून व कृतीभक्तीतून साकारुन प्रत्येक मनुष्यात "तू भगवंताचा अंश आहेस; त्यामुळे तू हीन, दीन, लाचार असू शकत नाहीस...." असा आत्म गौरव निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा जन्मदिन म्हणजेच प्रत्येक मनुष्याचाच गौरव दिन.... मनुष्य गौरव दिन
https://kurookshetr.blogspot.com/2018/10/blog-post_46.html
रायगड जिल्ह्यातील रोह्या सारख्या छोट्या गावात जन्माला येऊन सुद्धा भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंतरात घेऊन जाऊन कीर्ती प्राप्त केलेला "अगस्ती".
कोणतीही सत्ता, सामर्थ्य मागे नसताना सुद्धा पूर्व व पाश्चिमात्य संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणाररी तत्वज्ञान विद्यापीठा सारखी पूर्णतः देवावर विसंबून असलेली संस्था यशस्वी रीतीने चालवून जणू काही प्रतिसृष्टी निर्माण करणारे "विश्वामित्र".
जीवनात असंख्य चढउतार येऊन सुद्धा आयाचक व्रताने आ.ताईंसोबत आदर्श संसार करणारे "वसिष्ठ".
योगेश्वर कृषीच्या रूपाने भगवंताचं शेत करणारे लाखो पुजारी तयार करुन कृषीतून वैचारिक क्रांती घडवणारे "गौतम".
ज्ञान-कर्म-भक्ती ह्या चिरंतर "त्रयी"चा संगम घडवून "त्रिकाल संध्येच्या माध्यमातून" सन्मिलित पुनरुज्जीवन करणारे "अत्री".
जात-पात-पत-प्रतिष्ठा-पॉवर(ताकद) ह्यांचे जोडे बाहेर ठेवायला लावून; भगवंताच्या समोर एक परिवार म्हणून एकाच बैठकीवर बसून स्वाध्याय करायला लावणारे. ज्याला अध्यात्मात कोणीही थारा दिला नाही त्या प्रत्येकाला आपलेसे करणारे "कश्यप"
भगवान श्रीकृष्णाच्या गीतामृतांतुन वेळ आली तर २१ वेळा पृथ्वी नरेशांना आव्हान देण्याचे सामर्थ्य ठेवणारे आत्मविजयी परशुराम निर्माण करणारे "जमदग्नी"
अश्या एक ना अनेक रुपांत सात रंग भरून भाव-सौरभ भरणारे दादा आज ही माझ्या सारख्या लाखो स्वाध्यायींच्या हृदयात कायम आहेत.
ज्याच्या दिवसांची सुरुवात "कराग्रे" नी होते. तो स्वाध्यायी .....
भगवंत माझा आहे....,
भगवंत माझ्या सोबत आहे ......,
भगवंत माझ्यातच आहे ....
व माझ्या प्रत्येक कर्माला तो साक्षी आहे ही जाणीव ठेवणारा प्रत्येक जण स्वाध्यायी ....
भले त्याचे हात तो आज केंद्रात जात असो वा नसो.....
एकदा स्वाध्यायी .... जीवनभर स्वाध्यायी .....
कारण जीवन भरुनही दहा अंगुळे उरण्याची ताकद ही स्वाध्यायात आहे....
गीतेच्या तत्वज्ञानात आहे ....
हे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत आणून व कृतीभक्तीतून साकारुन प्रत्येक मनुष्यात "तू भगवंताचा अंश आहेस; त्यामुळे तू हीन, दीन, लाचार असू शकत नाहीस...." असा आत्म गौरव निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा जन्मदिन म्हणजेच प्रत्येक मनुष्याचाच गौरव दिन.... मनुष्य गौरव दिन
https://kurookshetr.blogspot.com/2018/10/blog-post_46.html