।।श्रीं।।
"आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे... आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदीनाले उतरुन जाण्यास वाट नाही. अमिरूलउमराव शाएस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे खपत होता .. "
ह्या शिवप्रभूंच्या वाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय ह्या वर्षीच्या मोहिमेत येत होता आणि शाएस्तेखान तीन वर्षे खपत होता म्हणजे नक्की काय करत होता ? ह्याचा अनुभव प्रत्येकालाच आला. कितीही बिकट प्रसंग आला तरी सुद्धा गुरुजी सुद्धा ह्याच मार्गावरून चालताहेत ह्या वाक्याने तर स्वतः स्वाभिमान व पौरुषाला आव्हान दिल्या सारखे वाटत होते.
ह्या वर्षी सर्व ठाणेकर अत्यंत जवाबदारीने वागले. आमचा खजिना मागे राहिला होता पण त्याची काळजी नव्हती ... पण, स्वप्निल राव दानवाले व त्यांनी आणलेल्या बछड्यांची खूप काळजी वाटत होती...वाटेत चालताना फाटाफूट झाली कोणी मागे राहिले तरी सुद्धा शेवटी समारोपाला सर्व एकत्र भेटले .. ज्याचा शेवट चांगला त्याचे सर्वच चांगले ह्याचा प्रत्यय आला.
अध्यात्म असो वा व्यवसाय; जगातील कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात आपले शिवपाईक धारकरी काळालाही आव्हान देऊन लढत लढत यशस्वी होणारे धारकरी भेटत होते आणि त्यामागे जी स्फुर्तीप्रेरणा होती ती म्हणजे श्री शिवाजी .. श्री सह्याद्री .. व श्री गुरुजी ...
बहुत काय लिहू ...
माझ्या अतिकोमल व मृदू वाणीने कोणाला फायदा झाला असेल तर धन्यवाद म्हणण्याची आवश्यकता नाही पण दुखावला असाल तर नक्कीच सांगा ...
"आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे... आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदीनाले उतरुन जाण्यास वाट नाही. अमिरूलउमराव शाएस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे खपत होता .. "
ह्या शिवप्रभूंच्या वाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय ह्या वर्षीच्या मोहिमेत येत होता आणि शाएस्तेखान तीन वर्षे खपत होता म्हणजे नक्की काय करत होता ? ह्याचा अनुभव प्रत्येकालाच आला. कितीही बिकट प्रसंग आला तरी सुद्धा गुरुजी सुद्धा ह्याच मार्गावरून चालताहेत ह्या वाक्याने तर स्वतः स्वाभिमान व पौरुषाला आव्हान दिल्या सारखे वाटत होते.
ह्या वर्षी सर्व ठाणेकर अत्यंत जवाबदारीने वागले. आमचा खजिना मागे राहिला होता पण त्याची काळजी नव्हती ... पण, स्वप्निल राव दानवाले व त्यांनी आणलेल्या बछड्यांची खूप काळजी वाटत होती...वाटेत चालताना फाटाफूट झाली कोणी मागे राहिले तरी सुद्धा शेवटी समारोपाला सर्व एकत्र भेटले .. ज्याचा शेवट चांगला त्याचे सर्वच चांगले ह्याचा प्रत्यय आला.
अध्यात्म असो वा व्यवसाय; जगातील कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात आपले शिवपाईक धारकरी काळालाही आव्हान देऊन लढत लढत यशस्वी होणारे धारकरी भेटत होते आणि त्यामागे जी स्फुर्तीप्रेरणा होती ती म्हणजे श्री शिवाजी .. श्री सह्याद्री .. व श्री गुरुजी ...
बहुत काय लिहू ...
माझ्या अतिकोमल व मृदू वाणीने कोणाला फायदा झाला असेल तर धन्यवाद म्हणण्याची आवश्यकता नाही पण दुखावला असाल तर नक्कीच सांगा ...
No comments:
Post a Comment